टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातमध्ये या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाचं लक्ष हे बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याकडे आहे. बांगलादेशवर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं होतं. आता या टी 20I मालिकेतील तिसरा सामना अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे जिथे टीम इंडियाची शानदार कामगिरी राहिली आहे.
उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने या मैदानात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने या मैदानात आतापर्यंत एकही टी20I सामना गमावलेला नाही. अशात युवा ब्रिगेडचा हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाने या मैदानात आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही टी20I सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच भारतीय संघाने या मैदानात एकूण 15 सामने खेळले आहेत त्यापैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. तर 4 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.
टीम इंडियाची आकडेवारी
भारतीय संघाने या मैदनात 2019 साली विंडिज विरुद्ध पहिला टी 20I सामना खेळला होता. तेव्हा टीम इंडियाने 208 धावांचं आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला होता. तर बैदराबादमधील दुसऱ्या सामन्यातही 6 विकेट्सने विजय मिळवलेला. तेव्हा टीम इंडियाने कांगारुंचा पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानात आणि मालिकेत विजयी हॅटट्रिक पूर्ण करणार का? याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.