समाज बांधवांनी राज्यपालांना जिल्हाधिकारी मार्फत दिले निवेदन
लातूर (Muslim Samaj Andolan) : देशभरासह महाराष्ट्रात इस्लाम धर्माबाबत व इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबरा विषयी अतिशय द्वोषपूर्ण व अपमानजनक वक्तव्य जाणीवपूर्वक करुन मुस्लीम धर्मीयांचे भावना दुखवण्याचे काम कांही भोंदू महाराज, कांही राजकीय पक्ष, संघटनेच्या वतीने केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना व लोकांचा छळ केला जात आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी लातूर येथे जन आक्रोश मोर्चा च्या माध्यमातून शासनाकडे संरक्षण, न कठोरपणे कायदे करून (Muslim Samaj Andolan) मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कांही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्हयातील रामगिरी नावाच्या व्यक्तीने मोहम्मद पैगंबराच्या जिवन चारित्र्यावर सुड बुध्दीने बेताल वक्तव्य केले होते. त्याबाबत बरेच निवेदन व तक्रार देऊन सुध्दा राज्य शासनाने व प्रशासनाने कसलीही दखल घेतलेली नाही. याचा परिणाम असा की, रामगिरी च्या बेताल वक्तव्याशी प्रेरित होऊन भाजपाचा नेता महाराष्ट्र विधानमंडळाचा सदस्य नितेश राणे याने भर सभेत (Muslim Samaj Andolan) मुस्लीमांना त्यांच्या मस्जीदीत घुसून मारहाण करण्याची भाषा केलेली आहे.
तसेच उत्तर प्रदेशातील नेहमीच मुस्लीम समाजा विषयी सुड उगवणारे व धार्मिक तेढ निर्माण करणारे महाराज नरसिमानंद सरस्वतीने सुध्दा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेलात विधान करुन सामाजिक वातावरण बिगडवून (Muslim Samaj Andolan) मुस्लीम धर्मीयांचे धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्या जात आहेत. साताऱ्यातील पुसेसावळी येथे जमावाने मुस्लिम वस्तीवर हल्ले केले व नुरुल हसन शिकलगर याची मॉब लिचिंग करत हत्या केली, मुस्लिम वसाहतीवरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून हल्लेखोर व कट रचणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कार्यवाही करावी, गाजापुर (विशालगड) मध्ये झालेल्या निंदणीय घटना ज्यामध्ये अतिक्रमणच्या नावाखाली विशेष करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना मस्जिद, दर्गा व धार्मिक पुस्तके पवित्र कुराण यांची विटंबना करण्यात आली. तसेच विशेष करून मुस्लिम घरांना टार्गेट करण्यात आले.
तसेच लातूर शहरात आजपर्यंत कसल्याही प्रकारचे जातीय भांडण किया दंगल झालेली नाही, परंतु गेल्या कांही वर्षापासून कांही संघटना या राजकीय पक्षामार्फत लातूर शहरामध्ये मुस्लीम धर्माविषयी जाणीव पूर्वक द्वोषपूर्ण वातावरण निर्माण केले जात आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एका (Muslim Samaj Andolan) मुस्लिम कुटूंबाला औसा ते लातूर रोडवर चारचाकी वाहनाने धडकून मारण्यात आले. अशा देशातील व महाराष्ट्रातील लातूर येथील मुस्लिम विरोधी घटना घडल्या आहेत. त्यामुळे याचा निषेध नोंदवून मुस्लिम विरोधी प्रक्षोभक भाषणे, करून जातीय सलोखा बिघडेल असे वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लातूर जिल्ह्य़ातील सकल मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी जन आक्रोश मोर्चाच्या द्वारे केली आहे. या वेळी सकल मुस्लिम समाजातील लोक उपस्थित होते.