Parabhani News| प्रशासनाच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी सुटले उपोषण

2 hours ago 1

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुधगाव महसुल मंडळातील आसेगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासह अन्य शेतीविषयक प्रश्नांवर इरशाद पाशा चांद पाशा यांचे सुरू असलेल बेमुदत उपोषण जिल्हा महसुल प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर बुधवारी (दि.९) सायंकाळी उशिरा सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन मदत देण्यात यावी. जाचक अटी रद्द करून १०० टक्के पीकविमा देण्यात यावा. सोयाबीनला ७ हजार तर कापसाला १२ हजार रूपये भाव देण्यात यावा. खरीप २०२१ व २०२३ मधील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा देण्यात यावा. करपरा नदीवरील बंधारा दुरूस्त करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी आसेगावात इरशाद पाशा यांनी सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणात शेतकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुधगाव मंडळातील दुधगाव, कौडगावन, सोना, आसेगाव, वस्सा, लिंबाळा, रेपा, नागणगाव, बोर्डी, डोहरा, मुडा आदी गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. अखेर प्रशासनाने सातव्या दिवशी बुधवारी या आंदोलनार्च दखल घेतली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांर्न त्यासाठी जिंतूरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृर्ष पर्यवेक्षकांचे शिष्टमंडळ पोलिसांसह आंदोलनस्थळ पाठवून मागण्यांबाबत चर्चा केली. स्थानिक स्तरावरील मागण्या लिखीत स्वरूपात मागण्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ स्तरावरील मागण्यांबाबत पत्र व्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर इरशाद पाशा यांनी उपोषण मागे घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article