अँटी इन्कम्बन्सीवर उपाय म्हणून भाजप 25 ते 30 आमदार:काही मंत्र्यांची तिकिटे कापणार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणाचा पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार

2 days ago 3
मराठा ओबीसी आरक्षण, कर्जबाजारी शेतकयांच्या वाढत्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार व इतर समस्यांमुळे सरकारविरोधात राज्यात तीव्र रोष आहे. लोकसभेला त्याचा फटका महायुतीला बसला. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने आपल्यापैकी सुमारे २५ ते ३० निष्क्रिय आमदारांची तिकिटे कापण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. यात काही मंत्र्यांचा समावेश असेल. ३ टर्मपेक्षा जास्त काळ आमदार राहिलेले व अंतर्गत सर्वेक्षणात ज्यांच्याबद्दल मतदारांनी नकारात्मक मत नोंदवले आहे. अशा आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिली. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणातही भाजप सरकारविरोधात अंटी इन्कम्बन्सी होती. त्याचा विरोधकांना फायदा होऊ न देण्यासाठी भाजपने सातत्याने निवडून येणारे आपल्याच पक्षाचे उमेदवार बदलले, मुख्यमंत्रिपदासाठीही नवीन चेहरा दिला. त्यामुळे जनतेचा रोष कमी होऊन नष्या चेहन्यांना संधी देण्याची भूमिका मतदारांनी घेतली, हरियाण्ठत नुकत्याचा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिथेही भाजपने ४० पैकी १४ आमदारांची तिकिटे कापली होती. त्यापैकी १० जागा पक्षाने पुन्हा जिंकल्या, मुख्यमंत्र्यांसा दोन विद्यमान आमदारांचे मतदारसंघाती बदलले. त्यापैकी मुख्यमंत्र्यांची जागा निवडून आली. आता हा बदलाबदलीचा प्रयोग महाराष्ट्रातही होणार आहे. २०१९ मध्येही भाजपने विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दमाज मंत्र्यांचेही तिकीट कापले होते. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मित्रपक्षांचा मात्र नकार शिंदे , अजित पवार सहन करणार नाहीत उमेदवार निवडीत हस्तक्षेप अॅन्टी इन्कम्बन्सी कमी करण्यासाठी आपल्या मित्रपक्षांनीही निष्क्रिय उमेदवारांची तिकिटे रद करून तिथे नवे चेहरे द्यावेत, यासाठी भाजप आग्रही आहे. लोकसभेच्या वेळीही भाजपने आपल्या तर शिदिसेनेच्याही खासदारांची तिकिटे कापली या नेत्यांबद्दल जनतेत नाराजी असल्याचे अंतर्गत सर्वेक्षणात समोर आले आहे, असे त्यांचे तेव्हा महणणे होते. पण तिथे दिलेले नये चेहरेही पराभूत झाले. त्यामुळे आता उमेदवार निवडीत भाजपचा हस्तक्षेप सहन करण्यास मित्रपक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे. आमचे उमेदवार आम्हाला ठरवू द्या, बंडात साथ देणाऱ्यांची तिकिटे आम्ही कापणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिदि व अजितदादांनी भाजपला सुनावले. त्यामुळे त्यांच्या आमदारांची तिकिटे मात्र भाजपात्य कापता येणार नाहीत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article