अजित पवार यांना बाजूला सारण्याचे भाजपचे पुरेपूर प्रयत्न:तिजोरीची लूट पाहूनच दादांचा काढता पाय; विजय वडेट्टीवारांची टीका

2 hours ago 1
महायुती सरकारमध्ये होणारे वाद आता नेहमीच झाले आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद होत आहेत. मात्र हे वाद राज्यातील जनतेच्या हितासाठी नाही तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हितासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तिजोरीत पैसा नसताना 80 निर्णय घेतले जात असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. अजित पवार यांना बाजूला सारण्याचे हे पुरेपूर प्रयत्न असावेत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अजित पवार हे अनेक वेळा अर्थ विभागाचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी काही प्रमाणात का होईना, या विभागात शिस्त पाळण्याचे काम केले आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये ही शिस्त बिघडवण्याचे काम सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तिजोरीत पैसे नसताना जीआर काढले गेले आहेत. त्यामुळे हे सर्व पाहिल्यानंतर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे अजित पवार यांच्या लक्षात झाले असेल. हे महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू आहे. हे पाहिल्यानंतरच अजित पवार यांनी काढता पाय घेतला असावा, असे मला वाटत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या सरकारला मागासवर्गीय समाजाची चिंता नाही. सामाजिक न्याय विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. बहुजन कल्याण सारख्या महत्त्वाच्या खात्याला देखील सचिव नाहीत. कृषी विभागाला सचिव नाहीत. गेल्या चार वर्षापासून मर्जीतील सचिव बसवून या सरकारने तिसरची लूट केली आणि स्वतःचा स्वार्थ साधला. अशा सरकारला महत्त्वपूर्ण खात्यांना पूर्णवेळ सचिव देता येत नाही. तर हे सरकार कोणत्या दिशेने चालवले जात आहे, हे महाराष्ट्र जनता पाहत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. केवळ टक्केवारी मोजण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. काल 80 विषय मंत्रिमंडळ बैठकीत होते. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. जाता जाता जेवढे शक्य आहे तेवढे महाराष्ट्राला लुटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अजित पवार यांनी कुठे जावे हा त्यांचा विषय आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत. त्यावरूनच ते अस्वस्थ आहेत. त्यातच महायुतीमधील विशेषता भाजप नेत्यांचे भाष्य हे अजित पवार यांना साईड लाईन करण्यासाठीच आहे, असे दिसत आहे. आता महायुतीने कोणाला घेऊन लढायचे हा त्यांचा प्रश्न असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही बातम्या वाचा.... महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर:अजित पवार-एकनाथ शिंदेमध्ये वाद? अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीतून घेतला काढता पाय? विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार हे दहा मिनिटातच निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातच वाद झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पूर्ण बातमी वाचा.... निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का:अमरावतीत अनेक नाराज नेत्यांचे राजीनामे; विश्वासात न घेता पदावरुन हटवण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर इतरही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा... नाशिकसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज:परतीचा मान्सून तूर्त नंदुरबार जिल्ह्यात खोळंबला महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईची पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काळी भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article