अजितदादांना युगेंद्र पवार देणार आव्हान?:बारामतीच्या मैदानात पुन्हा पवार विरुद्ध पवार; 64 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे

2 days ago 3
गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. पण तसे झाले तर ही काही पवार विरुद्ध पवार अशी पहिली निवडणूक नाही. 64 वर्षांपूर्वीही अशी निवडणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार बंधू एकमेकांच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवारांच्या मागे पवार कुटुंब श्रीनिवास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नीदेखील अजित पवार यांच्याविरोधात टीका करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीच्सया प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. यातच बारामतीमध्ये त्यांच्या नावाचे फिक्स आमदार असे बॅनर पहायला मिळाले. यासह पवार कुटुंबियांकडून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवारांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. श्रीनिवास पवारांनी साधला अजितदादांवर निशाणा खरं म्हणजे अजितदादा पवार नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो. मी जे बोलतो तसेच करतो,असे ते नेहमी म्हणतात. ते जर खरंच शब्द पाळणारे असतील तर ते निवडणुकीला उभे राहणारही नाही, सांगता येत नाही असे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार नालायक माणूस - श्रीनिवास पवार अजित पवार नालायक माणूस आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान त्यांना ठेवता आला नाही, अशी खरमरीत टीका अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केली आहे. श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चांगलाच टीकेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. शर्मिला पवारांची अजित पवारांवर टीका श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या घरात वडीलधारी माणसे आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्यामुळेच आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले? असे विचारण्यासारखे असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासूनच सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात माती खाल्ली का? आपण त्याला कारणीभूत होऊयात का? आपण त्याला गालबोट लावायचे का? असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कोणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचा आहे, हा मुद्दा असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. युग्रेंद्र पवार फिक्स आमदार:बारामतीत बॅनरबाजी बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोण आहेत युगेंद्र पवार? युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा मेळावेही घेण्यात आले होते. यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.​​​​​​​ शरद पवारांनी केला भावाविरोधात प्रचार 1960 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होती. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शेकापने शरद पवार यांच्या मोठ्या भावाला म्हणजे वसंतराव पवारांना उमेदवारी दिली. अन् शरद पवारांनी काँग्रेसला मदत करताना भावच्या विरोधात प्रचार केला. या निवडणुकीत वसंतराव पाटील यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले. शरद पवार त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की, माझा भाऊ काँग्रेसच्या विरोधात उमेदवार होता. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, मी काय करणार? अवघड परिस्थिती होती. भाऊ वसंतरावांना माझी अडचण समजली. त्यांनी मला फोन करून सांगितले, तू काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहा. माझ्या विरोधात प्रचार करायला अजिबात संकोच करू नको. त्यावेळी सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात संयुक्त समितीचे वातावरण होते. या निवडणूकीत बंधू शेकापचे उमेदवार असल्याने माझी कुचंबणा झाली त्यानंतर मी माझे आयुष्य काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचारात वाहून घेतले आणि गुलाबराव जेधे विजयी झाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article