अधिकाऱ्यांनी समाजसेवेचे व्रत घेऊन काम करावे:माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन

21 hours ago 1
अधिकाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन आणले पाहिजे. अधिकाऱ्यांनी समाजसेवेचे व्रत घेऊन काम करावे, असे आवाहन माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले. श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाउंडेशन संचलित स्पार्क अकॅडमी तर्फे प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन संघर्ष करत चिकाटी आणि जिद्दीने अधिकारी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्रवीण दीक्षित बोलत होते. स्पार्क अकॅडमीच्या मुलाखत बॅचच्या 28 विद्यार्थ्यांची राज्यसेवा 2022 परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तसेच १० विद्यार्थ्यांची सरळ सेवेतून विविध पदांसाठी निवड झाली. यानिमित्त हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपजिल्हाअधिकारी आणि महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, विवेक स्पार्क फाउंडेशनचे महेश पोहनेरकर, मुग्धा वाड, स्वागत दरख, मनीषा नर्डेकर आणि श्रीराम मंदिर ट्रस्टचे शरद सारडा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रवीण दीक्षित म्हणाले की, नवनियुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार मुक्त कर्मयोगी होऊन जनसामन्यांची सेवा करावी. यावेळी बोलताना माजी उपजिल्हाधिकारी आणि महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर म्हणाले की, प्रशासनात काम करत असताना सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे अतिशय महत्वाचे असते. सर्व सहकाऱ्यांच्या मनात संघ भावना असेल तर नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविणे शक्य होते. एकत्रित कामाचा परिणाम दीर्घकाळ असतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article