अन्नधान्य कमतरतेवर कृषी जैवतंत्रज्ञानाची मदत होऊ शकते:जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या मदतीने संशोधन करावे

1 day ago 1
कृषि स्नातकांनी त्यांच्या कौशल्यात प्रशिक्षणाद्वारे वाढ करून शेतकरी व पशुपालकांचे हित जोपासावे. तसेच विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील विकसित जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून उच्च प्रतीचे संशोधन करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी केले. विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणि यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री सहाय्यीत प्रकल्पांतर्गत “कृषि जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण व संशोधन प्रशिक्षण” या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. उदय खोडके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. खिजर बेग होते. यावेळी विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ.भास्कर आगलावे, डॉ.अच्युत भरोसे, डॉ.सारिका भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणासाठी पदवी,पदव्युत्तर व आचार्य पदवी मधील विविध अभ्यासक्रमातील एकूण ४० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ. राहुल चव्हाण यांनी, सूत्र संचालन ऋषिकेश मातळे तर आभार डॉ. विद्या हिंगे यांनी मानले. ^बदलत्या वातावरणास अनुरूप अन्नधान्य कमतरतेवर कृषि जैवतंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. कृषि जैवतंत्रज्ञानाचा उपयोग उच्च तापमान, पूर व अवर्षणात तग धरून राहणारे पिकांचे वाण विकसित होण्यास मदत होते. - डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article