अबब ! डाळिंब 500 रुपये किलो ! तुटवड्यासह पावसाच्या तडाख्यामुळे दर्जात घसरण

5 hours ago 1

गोड, रसाळ अन् लाल दाणेदार असलेले डाळिंब म्हणजे वर्षभर हमखास उपलब्ध असणारे फळ. कधी दाणे, तर कधी ज्यूसच्या स्वरूपात चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जाणारे हे फळ सध्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवत आहे. पाण्याच्या तुटवड्यासह पावसाच्या तडाख्याने फळांच्या दर्जात झालेली घसरण अन् परराज्यांतील खरेदीदारांनी बांधावरून सुरुवात केलेली खरेदी, यामुळे मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची आवक रोडावली आहे. दरम्यान, नवरात्रीमुळे डाळिंबाला मागणी वाढल्याने दर्जेदार डाळिंबाच्या किलोचे दर चक्क पाचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बारामती, माळशिरज, नातेपुते, इंदापूर परिसरातून डाळिंबाची आवक होते. बाजारात दररोज सरासरी 60 ते 70 टन डाळिंब दाखल होत आहेत. एरवी होणार्‍या आवकच्या तुलनेत सध्या होणारी आवक टिकून आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याच्या तुवड्यामुळे, तर काही ठिकाणी पावसाच्या तडाख्याचा परिणाम डाळिंबाच्या उत्पादनावर झाला आहे. त्यात परराज्यांतील खरेदीदारांनी बांधावरून दर्जेदार डाळिंबाची खरेदी सुरू केली आहे. परिणामी, मार्केट यार्डात डाळिंबाची आवक रोडावली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालामध्ये फक्त वीस टक्केच माल दर्जेदार आहे. उर्वरित माल रसाला कमी, तसेच आकाराने लहान असल्याचे चित्र आहे. त्यात नवरात्रीमुळे मालाला उठाव आहे. परिणामी, डाळिंबाच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याची माहिती डाळिंबाचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article