आमदारांबद्दल इन्कम्बन्सी असेल, तर सीट आम्हाला गमवायची नाही:केंद्रीय निवडणूक समिती निर्णय करेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान

2 days ago 2
भाजपच्या आमदारांबद्दल अँटी- इन्कम्बन्सी असेल तर ते बदलले जाऊ शकतात का?? त्याबद्दल केंद्रीय भाजप सर्वेक्षण केलेलं आहे, ते निर्णय करतील.. मात्र, काही आमदारांबद्दल इन्कम्बन्सी असेल, तर सीट आम्हाला गमवायची नाही, म्हणून केंद्रीय निवडणूक समिती त्याबद्दल निर्णय करू शकते,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीने जिंकण्यासाठी लढलं पाहिजे. संख्या वाढवण्यासाठी कोणीही मतदारसंघ घेऊ नये ना आम्ही न शिंदेंनी. 180 जागा घ्यायची आणि 50 जिंकायचे त्याला अर्थ काय आहे. ताकद असेल तरच मतदारसंघ मागावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, जिथे शिंदेंच्या पक्षाची शक्ती आहे, त्याच जागा त्यांनी लढल्या पाहिजे. जिथे आमची शक्ती आहे ती जागा आम्ही लढल्या पाहिजे. निवडणूक लढवायची आणि पराभूत व्हायचं हे आम्हाला आणि त्यांना कोणालाही परवडणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर कामठी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी बजावेल. मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही. 15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मविआ पराभवाच्या मानसिकतेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी आता पराभवाच्या मानसिकतेमध्ये असल्यामुळे वेगवेगळे आरोप करत आहेत. ते रोज सरड्यासारखे रंग बदलत आहे.लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात घेण्यात आली तर निवडणूक आयोगावर टीका केली, आता विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घेतली जात आहे तरी ते टीका करतात, असा टोला लगावला आहे. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची गरज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात विद्यमान आमदाराच्या मतदार संघावर चर्चा करण्यात येणार आहे. महायुतीचे सध्या आहेत त्या पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. अशी तयारी आम्ही केली आहे. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची गरज आहे. शिंदेसेनेच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेणारे भाजपचे माजी आमदार निलंबित रामटेक विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. त्याविरुद्ध भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भूमिका घेतली. काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन बंडाची तयारीही केली. त्याची गंभीर दखल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेड्डी यांना निलंबित केले आहे. रेड्डी आणि आमदार जयस्वाल परंपरागत विरोधक आहेत. 2014 मध्ये रेड्डी यांनी जयस्वाल यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये जयस्वाल यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यावर बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि ते रेड्डींविरुद्ध विजयी झाले होते. तेव्हापासून या दोघांमधील वाद आणखीच वाढला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावर जयस्वाल यांनी शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला. तेव्हाही रेड्डी यांनी जयस्वाल यांना महायुतीने सोबत घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती. पण फडणवीसांनी त्याला दाद दिली नाही. हे ही वृत्त वाचा अँटी इन्कम्बन्सीवर उपाय म्हणून भाजप 25 ते 30 आमदार:काही मंत्र्यांची तिकिटे कापणार मराठा ओबीसी आरक्षण, कर्जबाजारी शेतकयांच्या वाढत्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार व इतर समस्यांमुळे सरकारविरोधात राज्यात तीव्र रोष आहे. लोकसभेला त्याचा फटका महायुतीला बसला. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने आपल्यापैकी सुमारे २५ ते ३० निष्क्रिय आमदारांची तिकिटे कापण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. यात काही मंत्र्यांचा समावेश असेल. ३ टर्मपेक्षा जास्त काळ आमदार राहिलेले व अंतर्गत सर्वेक्षणात ज्यांच्याबद्दल मतदारांनी नकारात्मक मत नोंदवले आहे. अशा आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article