इमामपूर घाटातील खड्डे बुजवणे सुरू:मोठमोठे खड्डे पडल्याने या घाटात वारंवार भीषण अपघात

1 hour ago 2
मागील चार महिन्यांपासून प्रचंड दुरवस्था झालेल्या इमामपूर घाटातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. हा घाट नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगरपासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने या घाटात वारंवार भीषण अपघात होत होते. त्यामुळे दैनिक दिव्य मराठीने सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्यांसोबत ग्राऊंड रिपोर्ट करुन खड्डे बुजवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर या कामाला शनिवारपासून सुरुवात झाली. नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाट ते पांढरीपूल परिसरात मागील तीन महिन्यांत चार भीषण अपघात झाले आहेत. यात तिघे जण जागीच ठार तर २७ जण जखमी झाले आहेत. याशिवाय किरकोळ अपघातांची मालिका तर नित्याने सुरु आहे. मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक यामार्गे वळवल्याने या रस्त्यावरील रहदारी वाढलेली आहे. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढलेले होते. "दिव्य मराठी'ने २१ जुलैच्या अंकात या घाटातील दुरवस्थेचा ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. घाटात होणाऱ्या अपघातांना मोठे खड्डे, पांढरे पट्टे नसणे, सूचनाफलक नसणे, या बाबी कारणीभूत असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे घाटातील खड्डे प्राधान्याने बुजवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article