उमेदवार पाडण्यापेक्षा निवडून आणण्याबाबत विचार करावा:संभाजी राजेंचा मनोज जरांगेंना वडीलकीच्या नात्याने सल्ला

2 days ago 3
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने मराठा आरक्षणाविषयी निर्णय न घेतल्यामुळे जरांगे यांनी सरकार आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. कोणाच्या जागा वाढवायच्या की पाडायच्या ते आम्ही ठरवणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. जरांगेंच्या या भूमिकेवर संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उमेदवार कसा निवडून आणू शकतो याचा विचार करावा, असा सल्ला संभाजी राजे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. संभाजी राजे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आचारसंहिता लागण्याच्या अगोदर वेगळी असू शकते. आता आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगे यांना स्वतंत्र जायचे असेल तर ते जाऊ शकतात, पण कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उमेदवार कसा निवडून आणू शकतो याचा विचार करावा, असा वडीलकीच्या नात्याने माझा मनोज जरांगेंना सल्ला आहे, असे संभाजी राजे म्हणाले. राजकारणात यायचे असेल तर अनेक समीकरणे असतात. निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच बहुज घटकातील लोकांना सोबत घेणे हा राजकारणाचा भाग आहे, असेही संभाजी राजे म्हणाले. जरांगे आमच्यासोबत आल्यास आनंदच मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार उभे करावे, किंवा आमच्या तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे, अशी साद संभाजी राजे यांनी घातली. यासह संभाजी राजे यांनी पुन्हा मनोज जरांगे यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले असून मनोज जरांगे आमच्याबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल, असेही संभाजी राजे म्हणाले. 2024 मध्ये महाराष्ट्रात खालच्या पातळीवरील राजकारण आम्ही तिसरी आघाडी म्हणून नाही तर एक सुसंस्कृत पर्याय म्हणून पुढे येत आहोत. मागील 75 वर्षात पुढारी, मुद्दे आणि अजेंडा देखील तोच तोच आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात अगदी खालच्या पातळीवरील राजकारण झाले आहे. असे राजकारण मागील 75 वर्षात देखील झाले नव्हते. लोकदेखील आता व्यतीत झाले आहेत. त्यामुळे एक सुसंस्कृत पर्याय आणि सक्षम पर्याय म्हणून लोक परिवर्तन महाशक्तीकडे पाहत आहेत, असा दावा संभाजी राजे यांनी केला. हेही वाचा फडणवीसांच्या मराठा द्वेषामुळे राजकारणात जाण्याची वेळ:मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा निशाणा; विधानसभा लढवण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. निवडणूक आज जाहीर होणार असल्या तरी देखील त्या दोन-चार दिवस पुढे ढकलून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी पुन्हा निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे आमच्यावर राजकारणात जाण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article