काँग्रेस नेत्याचे 'लाडकी बहीण'वरुन फडणवीसांना आव्हान:म्हणाले - योजनेच्या विरोधात बोललो असेल तर सिद्ध करा, अन्यथा उठाबशा काढा

4 days ago 3
महायुती सरकारची महत्वाकांक्षी 'मुख्ममंत्री लाडकी बहीण' योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. राज्यभरातून या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अलिकडेच लाडकी बहीण योजनेविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरुन भाज आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते सुनील केदार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत आव्हान दिले आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात बोलले असेल, तर ते सिद्ध करा, अन्यथा उठा-बशा काढा, असे सुनील केदार म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे काँग्रेसच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सुनील केदार बोलत होते. मी लाडकी बहीण योजनेविरोधात बोललो असेल तर ते सिद्ध करा, अन्यथा संविधान चौकात उठा-बशा माराव्यात, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. सुनील केदार यांच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नेमके प्रकरण काय‌? अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार हे काँग्रेस नेते सुनील केदार यांचे जवळचे मित्र मानले जातात. यावरुन भाजप नेते सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे. त्यामुळेच ते आपल्या मित्र आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत आहेत, असा आरोप देखील कोहळे यांनी केला होता. काँग्रेसने राज्यातील महिलांची माफी मागावी, असेही सुधाकर कोहळे म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देत अनिल वडपल्लीवार काँग्रेसचे सदस्य देखील नाही, असा दावा करत नाना पटोले यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले. महायुतीची लाडकी बहीण योजना फसवी आहे. काँग्रेसने त्यापेक्षा चांगली महालक्ष्मी योजना समोर मांडली आहे, असेही पटोले म्हणाले. हेही वाचा... ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा संधी, अर्ज भरण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ​​​​​​​राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. पण ती आता 15 ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. राज्यातील ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ महिलांना घेता येईल. परंतु, 15 ऑक्टोबरपर्यंत भरावयाचे अर्ज हे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावे लागणार आहेत. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article