कामे केली असती तर दौरे करायची वेळ आली नसती:उदयनराजेंचा शरद पवारांना टोला, योजनांवर टीका करणाऱ्यांवर साधला निशाणा

21 hours ago 1
महाराष्ट्रात फुल स्विंग आणि फुल स्विपध्ये महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नसल्यामुळे ते योजनांवर टीका करत आहेत. विरोधक जर योजनांना नावे ठेवत आहेत, तर त्यांनी त्या योजना का आणल्या नाही? असा सवालही उदयनराजे यांनी केला. तसेच त्यांनी शरद पवारांबाबतही भाष्य केले. शरद पवारांनी कामे केली असती तर त्यांना आता इतके दौरे करावे लागले नसते, असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्र राजे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी आणा शिवेंद्र राजे आम्ही आमचे काम करत आहोत. आम्ही अनेक कामे मार्गी लावली आहेत. आमचे काम हाच आमचा अजेंडा आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात मी फिरणार असून जिथे गरज लागेल तिथे मी प्रचार करणार असल्याचे उदयनराजे म्हणाले. बोलण्यासाठी मुद्दे नसल्याने योजनांवर टीका करतात महाराष्ट्रात फुल स्विंग आणि फुल स्विपध्ये महायुतीचे सरकार येईल, असा उदयनराजे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत, त्यामुळे ते योजनांवर टीका करत आहेत. जर योजनांना हे नावे ठेवत आहेत तर त्यांनी त्या योजना का आणल्या नाही? असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे. स्वतः कुठल्या योजना आणायच्या नाहीत. दुसऱ्याने आणल्या तर त्याला नावे ठेवायची आणि टीका करत बसायची एवढेच यांना जमते. असा टोलाही त्यांनी लगावला. ...म्हणून शरद पवारांना दौरे करावे लागत आहे उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावरही भाष्य केले आहे. शरद पवारांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत तर वाढू द्या. लोकशाही त्यांना दौरे काढण्याचा अधिकार आहे. मात्र दौरे का वाढले आहेत? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले. त्यांनी कामे केली का? ती केली असती तर इतके दौरे करावे लागले नसते. कृष्णा खोऱ्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्यावेळी शरद पवारांनी तो का केला नाही? असा सवाल त्यांनी विचारला. शरद पवारांनी कामे केली असती तर त्यांना सांगता आली असती. ती नाहीत म्हणून त्यांना दौरे वाढवावे लागत आहेत, असा टोला उदयनराजे यांनी शरद पवारांना लगावला आहे. महायुतीने कामे केली आहेत त्यामुळे महायुतीने रिपोर्ट कार्ड आणले आहे. यांनी काही कामेच केलेली नाहीत, त्यामुळे हे टीका करत आहेत. असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article