कुरूम गाव ते रेल्वे स्थानक मार्गावरील पूल धोकादायक:नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

8 hours ago 1
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कुरुमपासून रेल्वे स्थानक चार किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन मार्गावरील १०० वर्ष पुरातन ब्रिटिशकालीन पूल क्षतिग्रस्त झाला असून या पुलावरून जाणे- येणे धोकादायक झाले आहे. परंतु, नाईलाजाने नागरिक आणि विद्यार्थी जीव धोक्यात घालून पूल पार करतात. यामुळे मोठी अप्रिय घटना घडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. यापूर्वी १७ एप्रिल रोजी पुलाच्या मधातील भाग अचानक सरकल्याने पुलाच्या भिंतींमध्ये मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले होते. याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली होती. कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक पर्यायी कच्चा मार्ग बनवून देण्यात आला होता. कच्चा मार्ग मान्सूनच्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आली. पर्यायी रस्ता नसल्याने शेवटी नागरिक, विद्यार्थी मजबुरीने जीवाचा धोका पत्करून या तुटलेल्या पुलावरून येणे जाणे करताना दिसून येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. भविष्यात अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुरुम रेल्वे स्टेशनचा मार्ग ब्रिटिशकालीन आहे. मागील वर्षी हा मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवण्यात आला होता. या मार्गावर कुरुमपासून एक किलोमीटर अंतरावर ब्रिटिश सरकारने मोठा लोखंडी पूल बनवला होता. त्याला जवळपास आता १०० वर्षे पूर्ण झालेले आहे. परंतु, अभियंतांच्या माहितीनुसार आज देखील पूल चांगल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आल्याने ग्राम सडक योजनेअंतर्गत पूल तसाच ठेवण्यात आला. लवकर पुलाचे काम करण्याची मागणी पुलावरून रात्रंदिवस वाहतूक केल्याने रस्ता व पूल क्षतिग्रस्त झाल्याचे म्हटले जात आहे. कुरूमपासून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची क्षमता दहा टन एवढी आहे. परंतु, खदानीचे अवजड वाहनांमध्ये २० ते ४० टन गौण खनिज भरून दहा चाकी वाहने चालतात. त्यामुळे या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळेच ब्रिटिश कालीन पुलाचा एक भाग पूर्णपणे तुटलेला आहे. नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास पाहता लवकरात लवकर या पुलाचे काम करण्यात यावे. आणि क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील बंदी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article