गांधी विचाराने देशाची प्रतिष्ठा जगात वाढली:शरद पवारांचे प्रतिपादन, पंतप्रधानांनाही लगावला टोला

2 hours ago 1
गांधी जयंती हा गांधीजींचा विचार देण्याचा हा जागतिक दिवस आहे. त्यांचे विचार जगाने स्वीकारला आहे. कुठेही गेले तरी त्यांच्या विचाराच्या खुणा दिसतात. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. तरीही गांधी या चित्रपटामुळे त्यांचे नाव जगाला कळाले, असे आपले पंतप्रधान म्हणतात, याबदल त्यांचे 'कौतुकच' केले पाहिजे असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे ज्येष्ठ नेते,माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन गांधी भवन येथे झाले.पुण्यात दि.१ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान या सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने,परिसंवाद,पुस्तक प्रकाशन,भजन, शांती मार्च ,खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव,पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते .डॉ. शिवाजीराव कदम, अभय छाजेड, एम.एस. जाधव,अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, रामदास फुटाणे,जयदेव गायकवाड,प्रशांत कोठडिया, प्रशांत जगताप,काका चव्हाण, युवराज शहा, विकास लवांडे,जांबुवंत मनोहर,डॉ. शशीकला राय, चंद्रकांत मोकाटे, अप्पा अनारसे उपस्थित होते . शरद पवार म्हणाले,'डॉ. कुमार सप्तर्षी आणि आम्ही एकत्र काम केले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बिगर काँग्रेस पहिले सरकार आले, त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.त्यात संघर्षात जे मजबुतीने उभे राहिले, त्यात एसेम जोशी,डॉ. सप्तर्षी होते. ऐक्याचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विदयापीठाला देण्यात यश आले. त्यात त्यांची साथ मिळाली. डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, बिगर संसदीय राजकारणात आमचा आणि संसदीय राजकारणात शरद पवार यांचा हात कोणी धरणार नाही. वसंतराव नाईक यांच्या काळात पहिला मिसा शरद पवार यांना माझ्या नावे काढावा लागला होता. तरीही पुलोद स्थापना,नामांतर प्रसंगी आमचे विचार कृती एकच होता . महाराष्ट्रात भावकीचे महाभारत चालू आहे . शरद पवार यांना भीष्माचार्याच्या भूमिकेत आहेत . सत्याचा सल्ला देणारे ज्येष्ठ असतात, बाकीचे म्हातारे असतात . सत्य हाच परमेश्वर आहे, हे गांधीजींनी ठामपणे सांगीतले. अशा गांधीजींना चैतन्याने जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना करण्यात आली.आता दोन्ही काँग्रेसचा गांधीजीं बदल स्मृतीभ्रंश झाल्यासारखे वातावरण आहे . त्यांच्या साठी गांधीजींचे विचार चैतन्य आम्ही जपून ठेवले आहे .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article