गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी:तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का‌? विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांना सवाल

5 days ago 3
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाब सिद्दीकी यांची काल मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाण साधला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. गुन्हेगारांना वचक राहिला नसून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. ते कुपर रुग्णालयाबाहेर बोलत होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. चार दिवसांनंतर आचारसंहिता लागू होईल. आम्ही त्यांचा राजीनामा मागून आमचे तोंड खराब करु इच्छित नाही. बाबा सिद्दीकी माझ चांगले मित्र होते. आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे. आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तो नेता लोकप्रिय होता आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम होते. काल झालेली घटना अत्यंत दुखद आणि वेदनादायी घटना आहे. त्या घटनेनंतर महाराष्ट्र किंवा मुंबईत कायदा सुव्यवस्था राहिली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. मागील भायकळ्यातील खुनाची घटना ज्या पद्धतीने करण्यात आली, त्यावरुन गुन्हेगारांना वचक, धाक राहिलेला नाही. आम्ही काही केले तरी सरकार आमच्या पाठीशी आहे, असे गुन्हेगारांना वाटत असेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. पुण्यात मागील सहा महिन्यांत काही घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच गँग पोसली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना समर्थन देत होते, त्यांना पाठिशी घालत होते, असा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला. सत्ताधारी अशा पद्धतीने वागत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, असा सवाल त्यांनी केला. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकार आणि गृहमंत्र्यांची आहे. महाराष्ट्रात पोलिसांचे दोन ग्रुप पडले असून त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये प्रोत्साहन दिसत नाही. मर्जीच्या ठिकाणी मर्जीतल्या माणसाला बसवण्याच्या हट्टापायी पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचणी येत आहेत. त्यामुळे हे गुंड यांना अभय मिळाल्यासारखे वाटते म्हणून मुंबईत अशाप्रकारच्या घटना होतात, असे वडेट्टीवार म्हणाले. ही झालेली घटना दुखद आहे. याची चौकशी होईल, त्यामागचा सुत्रधारही समोर येईल. पण मुंबई युपी बिहारच्या दिशेने जात आहे. शांत असलेली मुंबई गुंडराजाची होती का काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे गृहमंत्री कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, हे स्वत:ला विचारा, असे मी फडणवीसांना विचारणार आहे. एवढे सगळे होऊनही तुम्हाला त्या पदावर राहायचा अधिकार असेल तर बसा. पुन्हा राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा धज्जा उडाला तरी तुम्हाला प्रिय आहे, हे जनता बघेल, अशी टीका त्यांनी केली. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article