जिल्ह्यातील दहापैकी नऊ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के साठा:पाणीप्रश्न मिटला, चार प्रकल्पांतून विसर्ग सुरू ; शेती सिंचनालाही पाणी मिळणार

3 days ago 3
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने काही प्रकल्प सप्टेंबरच्या अखेरपर्यंत, तर काही प्रकल्प ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के भरले आहेत. बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत ३ मोठे व ७ मध्यम प्रकल्प मिळून जिल्ह्यात १० प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी ९ प्रकल्पांमधील जलसाठा १०० टक्के झाला आहे, तर ४ प्रकल्पांच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने या प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना रब्बी पिके, भाजीपाला व फळबागांच्या लागवडीसाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार काहींना कालव्याद्वारे, तर काहींना पाटाद्वारे पाणी मिळणार आहे. यंदा पाऊस चांगला बरसल्याने अनेक शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. नद्यांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणी आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी हे तीन मोठे तर ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, पलढग, तोरणा व उतावळी हे ७ मध्यम, तर ४१ लघु प्रकल्प आहेत. मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाण्याची एकूण टक्केवारी ९२.५९ टक्के आहे. या प्रकल्पांमधून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमधील नागरिकांना यंदा तरी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ऑक्टोबर महिना उलटूनही भरले नव्हते. परंतु, यंदा त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. कोराडी मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. खडकपूर्णा, पेनटाकळी, मस व पलढग प्रकल्पाच्या सांडव्यावरून गत ८ ते १० दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिना आरंभ होण्यापूर्वी या प्रकल्पांमधील जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली होती. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. अशी झालेली वाढ सर्वांना सुखावणारी ठरली आहे. प्रकल्प जलसाठा टक्केवारी नळगंगा ६९.३२० १०० खडकपूर्णा ९३.४०४ १०० पेनटाकळी ५९.९७६ १०० ज्ञानगंगा ३३.९२९ १० ० मस १५.४० १०० कोराडी ९.३४० ६१.७७ पलढग ७.५१० १०० मन ३६.८३० ०० तोरणा ७.८९० १०० उतावळी १९.७९० १०० हजारो हेक्टरवर सिंचन सन‌् २०२४ - २०२५ मध्ये या प्रकल्पांमधील पाण्याच्या माध्यमातून हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांना सिंचन करता येणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांकडून पाण्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या रकमेची शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे. १३ ऑक्टोबर रोजीचा जलसाठा व टक्केवारी

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article