ज्येष्ठ नागरिकांचे 'मत' दुर्लक्षून चालणार नाही:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मत

2 hours ago 1
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठांच्या मतांचा टक्का सुमारे १३% च्या जवळपास होता. जिंकून येण्यासाठी ही आकडेवारी मोठी असून लोकशाहीत ज्येष्ठ नागरिकांचे 'मत' दुर्लक्षून चालणार नाही असेच चित्र आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. जनसेवा फाउंडेशन पुणे, सामाजिक न्याय व विशेष विभाग महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व सबलीकरण विभाग भारत सरकार, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती अभिमत विद्यापीठ, फेस्कॉम, अॅस्कॉप, आय. एल. सी. (आय) पुणे, नवचैतन्य हास्ययोग परिवार, भारतीय योग संस्थान, एकता योगा ट्रस्ट, मुकुल माधव फाउंडेशन, हेल्पेज इंडिया आणि विविध जेष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक 'ज्येष्ठ नागरिक दिन' आणि ज्येष्ठांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटन प्रसंगी जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, पद्मश्री आचार्य चंदना, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, जनसेवा फाउंडेशन पुणेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना विनोद शहा, जयसिंगराव पाटील, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, जनसेवा फाउंडेशन पुणेचे खजिनदार राजेश शहा, ज्येष्ठ मंदिर आणि मूर्तीशास्त्र तज्ज्ञ डॉ.गो.ब.देगलूरकर, सुहास पटवर्धन, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका शेवंताबाई महादेव चव्हाण यांना जनसेवा फाउंडेशनचा कै. प्रवीण चंद्र श्रॉफ जीवन गौरव पुरस्कार, तर रखमाबाई शेळके (१०६ वर्ष), माधुराबाई विश्वनाथ माने (१०५ वर्ष) आणि बबन दौलतराव निवंगुणे (१०१ वर्ष) यांना शतायुषी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, एकूण लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांची संख्या ९५ कोटींच्या घरात असून ६० वयोमर्यादेच्या वर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ कोटींच्या घरात आहे. ७० वयोमर्यादेच्या वर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ७ कोटी आहे. ८० वयोमर्यादेच्या वर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अडीच कोटींच्या वर आहे. ८५ वयोमर्यादेच्या वर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ८२ लाख आहे आणि १०० पार केलेल्या ज्येष्ठांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरिक मोलाची भूमिका निभावतील. केवळ नकारात्मक आणि दुःखी मनोभुमिकाच ज्येष्ठांचे आयुर्मान कमी होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच दीर्घ आयुर्मानासाठी ज्येष्ठांनी सक्रिय आणि आनंदी राहणे आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या आंनदी राहण्यावर परिणाम काणारा महत्त्वाचा घटक असून एकत्र कुटुंब पद्धती पुन्हा अस्तित्वात येणे आवश्यक असल्याचे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article