झाडे लावणार पण ती जगणार कशी?:पर्यावरणप्रेमींनी लावलेली ‎500  झाडे मनपाने तोडल्याचा आरोप, दुभाजकात न लावता खुल्या जागेवर लावा झाडे; महानगरपालिकेचे म्हणणे

4 days ago 3
काही दिवसांपूर्वी 'वी फॉर एनव्हायरमेंट' संस्थेने‎ टीव्ही सेंटर ते हर्सूल रस्‍त्यावरील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दुभाजकामध्ये सुमारे 500 विविध जातीच्या ‎झाडांची लागवड केली होती. पण ‎महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही झाडे तोडून ‎फेकून दिल्याचा आरोप करत संस्थेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.‎ या कृत्याचा निषेध करण्यासाठी संस्थेसह सर्व पर्यावरण प्रेमींनी मोर्चा काढून महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला. रविवारी (दि. 13) हा मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी सहभागी झाल्याचे दिसून आले. जळगाव रोडवर दुभाजकांमध्ये लावलेली ‎चिंच, वडासह इतर जातीचे सुमारे 500 झाडे ‎‎महापालिकेने काढून फेकून दिल्याचा आरोप‎ 'वी फॉर एनव्हायरमेंट' संस्थेने केला आहे. ही‎ झाडे दुभाजकात न लावता, खुल्या जागा व ‎‎रस्त्याच्या कडेने लावण्याचे आवाहन केलेले ‎‎असताना चुकीच्या ठिकाणी लावलेली झाडे ‎काढून आम्ही योग्य ठिकाणी लावत असल्याचे ‎‎महापालिकेचे म्हणणे आहे.‎ तर सिमेंटचे ‎रस्ते उन्हाळ्यात तापतात. दुभाजकामधील ‎झाडांमुळे रस्त्यावर सावली पडून तापमानात ‎वाढ होणार नाही.‎ असे संस्थेचे म्हणणे आहे. जी. श्रीकांत यांना दिले होते निवेदन मोर्चानंतर वी फॉर एनव्हायरमेंट संस्थेने या झाडांना श्रद्धांजली अर्पण केली. मागील 10 वर्षांपासून या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध रस्त्यांवर किंवा दुभाजकांवर देशी प्रजातीचे विविध महत्त्वाचे झाडे लावण्याचे काम सातत्याने सुरु आहे. या उपक्रमाचे समाजाच्या विविध स्तरातून वेळोवेळी कौतुक करण्यात आलेले आहे. मागील वर्षी संस्थेने मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन देऊन शहरांमधील मुख्य रस्त्यांमधील डिव्हायडर मध्ये लिंब, बकुळ, आंबा, करंज, कांचन अशा विविध प्रकारचे देशी झाडे लावण्यासंदर्भात संस्थेने विनंती केली होती. अधिकाऱ्यांवर कारवाई करा यावेळी संस्थेचे पदाधिकारी म्हणाले, साईड मार्जिनमध्ये नवीन झाडे नागरिक , दुकानदार, घर मालक लावू देत नाही. तसेच शहरात चालू असल्यामुळे वॉटर लाईन, गॅस लाईन, ड्रेनेज लाईन व इतर कारणामुळे बरीचशी साईड मार्जिनमधील झाडे तोडून डेव्हलपमेंट केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी एक झाड तोडले तर त्याला फाईन भरावा लागतो. महानगरपालिकेने तर 500 झाडे तोडले याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी आमची मागणी असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. पूर्ववत रोपण करा 500 झाड पूर्ववत त्या ठिकाणी रोपण करण्यात यावे अशी विनंती करण्यासाठी मोर्चामध्ये वी फॉर एन्व्हायरमेंटचे स्वंयसेवक मेघना बडजाते, कमल कुमार पहाडे, संजय आंबेकर, डॉ. वर्षा फलके पवार, अनिकेत वाघचौरे, विजय शर्मा, भूपेश शर्मा, सनांसे, विशाल सुरासे, माधुरीताई, पर्यावरण गती विधीचे सर्जेराव वाघ, राजेंद्र, यांनी निदर्शने केली. वृक्षारोपणासाठी पुढाकार ‎घेणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे की, झाडांना आम्ही तोडलेले नाही-पाटील महापालिकेचे उद्यान अधिक्षक विजय पाटील यांनी 'दिव्य मराठी डिजिटल'ला या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे ‎लावली जातात. महापालिकेसह विविध ‎संघटना वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतात.‎ दुभाजकांमध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच अशी‎ देशी प्रजातीची झाडे लावली जात आहेत. ‎मात्र लहान दुभाजकांमध्ये अशी झाडे तग धरू‎ शकत नाहीत. कालांतराने ही झाडे मोठी‎ होऊन ती रस्त्यावरच कोसळण्याची भीती‎ असते, त्यामुळे महापालिकेने दुभाजकांमध्ये‎मोठी झाडे न लावण्याचे आवाहन केले होते. या झाडांमुळे पुढे ट्रॅफिकचीही समस्या निर्माण झाली असती. या झाडांना आम्ही तोडलेले नाही. तर त्यांना आमच्या नर्सरीमध्ये शिफ्ट केले आहे. योग्य ठिकाणी आम्ही त्यांची लागवड करणार आहोत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article