टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता नाही:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट, अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याचे समाधान

4 days ago 3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या वतीने मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यावर टोलमाफी करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या टोल माफीमुळे कारने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्यांना दिलासा मिळणार आहे. या टोलमाफीद्वारे मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजनेचा शुभारंभ केला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच हा निर्णय निवडणुकीपुरता नसून पुढेही टोलमाफी राहणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article