दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री:महायुती सरकारवरही केले गंभीर आरोप

2 hours ago 1
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याची मिमिक्री देखील केली. मध्यंतरी कोणीतरी म्हणत होतं, गेल्या दोन वर्षांत आणि म्हणोन... आणि म्हणोन... शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करत होते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी, 'आणि म्हणोन, आणि म्हणोन' बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला. मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की, या प्रकल्पाच्या फाईलवर सही करु नका. अन्यथा एका महिन्यात आमचे सरकार येत आहे. तुम्हाला आत राहायचे आहे की बाहेर राहायचे आहे, हे तुम्हीच ठरवा, असा थेट इशाराच दिला आहे. आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला आहे. जेव्हा आम्ही दावोसला गेलो होतो तेव्हा आम्ही 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, शिंदे सरकार जेव्हा दवोसला गेले तेव्हा चार दिवसातच 45 कोटी रुपये खर्च करून आले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. महायुती सरकारवर आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार निर्णय घ्यायला घाई करत आहे. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानीचे सर्व जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article