दिल्लीवरुन आदेश आल्यामुळे फडणवीस घाबरलेत:त्यामुळेच वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, आमदार रोहित पवार यांची टीका

2 hours ago 1
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापुरात एका कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाला असे वक्तव्य केले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज्यात भाजप विधानसभेला 60 जागांपेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाहीत. आता हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा करा आणि त्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडून आला असेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले की, विधानसभेला भाजप 60 तर महायुती एकत्र करून 115 जागांच्या पुढे जात नाही. आता पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे तुम्ही पूर्वीच्या स्टाईलने जावा, हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा करा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडून देवेंद्र फडणवीसांना आला असेल. महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. मुश्रीफांनी पुरोगामी विचार जपला नाही रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. एखादा गुरु चांगल्या विचाराचा असेल आणि महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल, तर अशा गुरुला गुरुदक्षिणा विचार करून आणि जपून द्यायला हवी. मात्र मुश्रीफांनी पुरोगामी विचार जपला नाही. विचार जपून जनतेसाठी काम करणे हसन मुश्रीफ यांच्यासह त्या नेत्यांना जमले नाही. त्यामुळेच ते स्वार्थासाठी महायुतीसोबत गेले आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. सरकार निर्लज्ज झाले आहे रोहित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या दर्जाहीन गणवेशांवर देखील भाष्य केले. राज्यातील आतापर्यंत केवळ 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाले आहे. जे गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले ते दर्जाहीन असून वेडेवाकडे शिवलेले आहेत. गणवेश वाटपात सरकारने गुजरातचे कापड घेतले. पणा शिवायला कुठे दिले ते माहीत नाही. इतर विभागांप्रमाणेच गणवेश वाटपातही भ्रष्टाचार झाला आहे. सरकार इतके निर्लज्ज झाले आहे की, छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि विद्यार्थ्यांच्या गणवेशातही पैसे खात आहे, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article