दीक्षाभूमीमध्ये दर्शनासाठी अनुयायींची गर्दी:भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात सामुहिक बुद्ध वंदना; रात्रीपासून नागरिक रांगेत

2 hours ago 1
नागपूरमधील दीक्षाभूमीवर 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी पोहोचले आहेत. नागपुरातील दीक्षाभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अनुयायींची ये-जा सुरू झाली होती. काल रात्रीपासून दीक्षाभूमीवर अनेक कार्यक्रम होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होत असून काल रात्रीपासून नागरिक रांगेत उभे आहेत. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवरच क्रांतीची सुरुवात केली होती. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर आपल्या 5 लाखांहून अधिक अनुयायांना बौद्ध धर्माची ओळख करून दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी या दिवशी देशभरातून बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी येतात. आज सायंकाळी 6 वाजता भिक्कू संघाच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन परिषदेचा समारोप होणार आहे. यावेळी प्रथमच कोणत्याही राजकारण्याला मंचावर स्थान दिले जाणार नाही. या वेळी 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी दीक्षाभूमीवर दोनशेहून अधिक पुस्तकांची दुकाने उभारण्यात आली आहेत. सामुहिक बुद्ध वंदना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरात दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात सामुहिक बुद्ध वंदना देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी, आपल्या लाखो अनुयायांना, बौध्द धम्माची दीक्षा दिली होती. याच दिवशी सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी, आपल्या अनुयायांसह मुख्य स्टेज समोर सामुहिक बुद्ध वंदना घेतली होती. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा नेतृत्वात दीक्षाभूमी स्मारक समिती आणि समता सैनिक दलाचा प्रमुख उपस्थितीत, सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी शेकडो बौध्द अनुयायी उपस्थित होते. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... यंदा उलथापालथ करावीच लागेल:मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा; आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर आज मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरांत मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा पार पडला. यावेळी जरांगे यांनी सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, तर नाईलाजाने उलथापालथ करावीच लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला. पूर्ण बातमी वाचा... झाडावरची शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ, वचपा घेण्याची वेळ:दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांचा मतदारांशी संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कोणीही बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरील शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ आली आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सगळ्यांचा तुम्हाला आता वेध घ्यावा लागणार असल्याचे आवाहन देखील राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचा.... देवेंद्र फडणवीसांकडून होमगार्ड्सना दसरा गिफ्ट:मानधन दुप्पट करण्याचा निर्णय, प्रतिदिवस 570 रुपयांवरून 1083 रुपये राज्यभरात विजया दशमीचा उत्साह सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील होमगार्डचे मानधन जवळपास दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे. या संबंधीचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबर पासून राज्यातील होमगार्डला ही वाढ देण्यात येणार आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article