देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करा, संजय राऊत आक्रमक:आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय गृहमंत्री म्हणत राज्यपालांकडे राजीनामा घेण्याची मागणी

5 days ago 3
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय असे गृहमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे सांगण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा मागावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. त्यांच्याभोवती अनेक माणसे होती. महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीने हे हत्यांचे सत्र सुरू आहे. ते आता राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले आहे. माजी मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या राज्यात कोण सुरक्षित आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील अपयशी गृहमंत्र्यांनी हे स्पष्ट करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात सामान्य जनता सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी - उद्योगपती सुरक्षित नाहीत, आता राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, माजी मंत्री देखील सुरक्षित नाहीत. अशावेळी गृहखाते काय करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्याचे गृहमंत्री हरियाणामध्ये निवडणुका जिंकल्या म्हणून येथे पेढे वाटतात. दुसरीकडे राज्यातील जनतेसमोर दिवसाढवळ्या हत्या सुरू आहेत. खंडणीची मागणी सुरू आहे. अशावेळी गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक सिंघम आणि दोन डेप्युटी सिंघम राजाला एक सिंघम आणि दोन डेप्युटी सिंघम लाभले आहेत. तरी देखील राज्यात हत्यांचे सत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. इतके दिवस आम्ही फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी करत होतो. मात्र आता फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. राज्यपालांनी फडणवीसांकडेकडे राजीनामा मागावा अशी मागणी देखील त्यांनी केली. एकनाथ शिंदे राज्यातील पोलिसांचा वापर करतात गुंडांच्या टोंळ्याच्या ज्या पद्धतीने चालवल्या जातात त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. मात्र दोन महिन्यानंतर या सर्व पोलिसांचा हिशोब केला जाईल, हे देखील पोलिसांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सध्या मोदी आणि शहा आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांना पळवत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीसांवर देखील निशाणा देवेंद्र फडणवीस यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. देवेंद्र फडणवीस काय होते आणि काय झाले? असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधला. त्यांचे अध्यपतन आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. विरोधकांच्या विरोधात काड्या करण्यापेक्षा, रात्री होडी घालून फिरण्यापेक्षा, आपल्यावर राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पदाला कर्तव्य भावनेने जागून काम करा, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article