देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत:माजी आमदाराने केली मागणी, भाजप पक्षाने केले निलंबन

3 days ago 2
भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, अशी मागणी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे पक्षाने त्यांना तब्बल 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून दिलेल्या उमेदवारीला देखील विरोध केला होता. मल्लिकार्जुन रेड्डी यांना भाजप पक्षाने अधिकृत पत्र पाठवले आहे. यात, आपण आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी असताना पक्ष विरोधी कारवाया करत पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला 6 वर्षांकरता पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. भाजप कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे पत्र मल्लिकार्जुन रेड्डी यांना पाठवले आहे. काय म्हणाले होते मल्लिकार्जुन रेड्डी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे विद्यमान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विरोध केला होता. एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचे नाही. भाजपचा मुख्यमंत्री हवा. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांच्या रामटेक मतदारसंघात काम करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मी महायुतीचा सन्मान करतो. मात्र आशिष जयस्वाल यांना विरोध आहे. नागपूर जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदार येऊ नये, अशी आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पुढे मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले, महायुतीचे धर्मपालन कसे करणार? आशिष जयस्वाल यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मदत केली नाही. कार्यकर्त्यांना मानसन्मान नाही. निधी देत नाहीत. ते अपक्ष बंडखोर आमदार होते. विदर्भात न्याय मिळाला पाहिजे. 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. आम्ही आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही फाशी दिली तरी चालेल. उमेदवार बदलला पाहिजे, हे पक्षाचे वफादार नाहीत. भाजपने पुन्हा विचार करावा. माझ्याकडे काय आहे, काहीच नाही, आमच्यावर काय कारवाई करणार, असे रेड्डी म्हणाले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article