नागरिकता वादावर ‘सुप्रीम’ फैसला; सरकारची बाजू मजबूत, कलम 6A वर शिक्कामोर्तब, काय होणार परिणाम?

2 hours ago 1

Citizenship Act Supreme Court Verdict : देशात नागरिकता कायद्यावरून दोन पक्ष एकमेकांविरोधात ठाकले आहे. सीएए मुद्यावरून राजकारण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा वरचढ होता. आता नागरिकता वादावर सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. आता सरकारची बाजू मजबूत झाली आहे.

नागरिकता वादावर 'सुप्रीम' फैसला; सरकारची बाजू मजबूत, कलम 6A वर शिक्कामोर्तब, काय होणार परिणाम?

नागरिकतेवर सर्वोच्च फैसला

| Updated on: Oct 17, 2024 | 11:53 AM

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी एक महत्त्वाचा फैसला सुनावला. नागरिकता अधिनियमाच्या कलम 6ए ची वैधता कायम ठेवण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या ताज्या निर्णयामुळे सरकारी पक्षाची बाजू मजबूत झाल्याचे मानल्या जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 6ए ची वैधता कायम ठेवली, जी 1985 मध्ये आसाम करारानुसार सादर करण्यात आली होती. त्यानुसार, हे कलम मार्च 1971 पूर्वी भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशातील प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्यापासून रोखते. सर्वोच्च न्यायालयाने 4-1 अशा बहुमताने हे कलम कायम ठेवले. केवळ न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांनी या मुद्दावर असहमती दिली. गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल राखून ठेवला होता.

बातमी थोड्याचवेळात सविस्तर…

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article