महाविकास आघाडीची जागा वाटपाची शेवटची बैठक, तासाभरापासून खलबतं; फॉर्म्युला फिक्स होणार?

2 hours ago 1

Mahavikasaaghadi spot sharing look : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

आजच या जागांवर शिक्कामोर्तब

महाविकासआघाडीच्या या बैठकीला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थितीत आहेत. तर शरद पवार गटाकडून शरद पाटील, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले हे नेते उपस्थित असल्याचे बोललं जात आहे. यांसह काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थितीत आहेत. गेल्या दोन तासांपासून अधिक काळ महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक सुरु आहे. त्यामुळे आजच या जागांवर शिक्कामोर्तब हेईल, असे म्हटले जात आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीतील जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे. महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे. त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article