नाना पटोले यांना मी मोजत नाही:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गद्दार, अशोक चव्हाणांचा संताप; समर्थकांच्या हकालपट्टीमुळे झाले संतप्त

1 hour ago 1
काँग्रेसने अशोक चव्हाण समर्थक अर्धापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या अशोक चव्हाण यांनी मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी नाना पटोले यांना मोजत नाही, तर काँग्रेसचे येथील जिल्हाध्यक्ष बी आर कदम हे गद्दार आहेत, असे ते म्हणालेत. अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून येईल असे वाटत होते. पण तिथे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांचा विजय झाला. यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये बॅकफूटवर फेकल्या गेले. आता काँग्रेसने नांदेड येथील अशोक समर्थक नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण समर्थकांना पक्षाबाहेरचा रस्ता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी अर्धापूर नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्वजण अशोक चव्हाण समर्थक होते. काँग्रेसच्या या कारवाईविषयी पत्रकारांनी मंगळवारी अशोक चव्हाण यांना छेडले असता त्यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. मी नाना पटोले यांना मोजत नाही. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम हे गद्दार आहेत, असे ते म्हणाले. पटोलेंनी बी आर कदमांना दिले होते कारवाईचे सर्वाधिकार उल्लेखनीय बाब म्हणजे अर्धापूर नगरपंचायत ही अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता. काँग्रेसने ही बाब ओळखून या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी काँग्रेसविरोधात भाजपचा प्रचार केल्याचा अहवाल जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बी आर कदम यांनाच या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यानुसार, कदम यांनी ही कारवाई केली. चव्हाण यांचा लोकसभेचे अपयश पुसून टाकण्याचा होता प्रयत्न नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना जबर झटका बसला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत अपयश आल्यामुळे अशोक चव्हाण यांचे केंद्रातील मंत्रिपद हुकले अशी चर्चा नांदेडच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे अशोक चव्हाण लोकसभेचे अपयश विधानसभा निवडणुकीत पुसून टाकण्याच्या प्रयत्नांत होते. पण काँग्रेसने त्यांच्या काँग्रेसमधील समर्थकांची हकालपट्टी करत त्यांना जोरदार धक्का दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article