नाल्यावर पूल नसल्यामुळे कमरे इतक्या पाण्यातून जाण्याची वेळ:म्हसदीचा उमराड नाला जीव धोक्यात घालून लागतो ओलांडावा

4 days ago 3
येथील विश्वेश्वर मंदिराजवळील उमराड नाला एक महिन्यापासून वाहतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमराड नाल्यावर ककाणी-देऊर शिवाराला जोडणाऱ्या रस्त्यावर सिमेंट पाइप मोरी अथवा फरशी पूल बांधावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या विषयी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले. येथील विश्वेश्वर मंदिराजवळ उमराड नाला आहे. पावसाळ्यात दरवर्षी या नाल्याला पूर येतो. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने परिसरातील शेतकऱ्यांना नाला ओलांडून शेतात जाणे अवघड होते. अनेक शेतकरी जीव धोक्यात टाकून नाल्यातून जातात. गेल्या दोन महिन्यापासून नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे म्हसदी ते ककाणी व देऊर शेतशिवारात जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. परिणामी शेतीची कामे खोळंबली आहे. आता पिके कापणीची वेळ आहे. शेतात गुरे असल्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांना गुरांचा चारा टाकण्यासाठी कमरे इतक्या वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून जावे लागते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा दुधाचा जोड व्यवसाय आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी दूध घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. या पार्श्वभूमीवर विश्वेश्वर मंदिराजवळील उंभराड नाल्यावर ककाणी गावठाणकडे जाणारा जोड रस्ता तसेच धोबीनाला ते ककाणी व सापट्या शिवार ते ककाणी, देऊर शिवाराला जोडणाऱ्या रस्त्यांवर पाइप मोरी अथवा फरशी पूल बांधवा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, प्राचार्य सतीश देवरे, रमेश देवरे, दगाजी दोधू देवरे, दिलीप उत्तम देवरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article