Sanjay Raut connected BJP Shivsena : खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. नेहरु आणि इंदिरा गांधींच्या चरणाचे तीर्थ प्या, असं संजय राऊत म्हणालेत. तर संजय राऊत यांनी पहिल्यांदाच पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले? वाचा सविस्तर...
संजय राऊत
ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या, त्याच भीतीपोटी महाराष्ट्राच्या निवडणुका टाळत आहेत. त्यासाठी महापालिकांच्या निवडणुका घेत नाही. हे भेदरट, डरपोक आणि बुळचट सरकार आहे. ज्यांना निवडणुकांना सामोरे जायची भीती वाटते त्यांनी इंदिरा गांधीचा आदर्श ठेवला पाहिजे. आणीबाणीत इंदिरा गांधींनी निवडणुका घेतल्या. पराभव होणरा हे माहीत होतं तरीही त्यांनी निवडणुका टाळल्या नाही. त्यामुळे भाजप आणि मिंध्यांनी इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या चरणांचे तीर्थ प्राशन केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.