'परिणाम वाईट होतील':नागपूर पोलिसांना धमकावल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांचा जिल्हा असल्याने चर्चा

2 hours ago 1
नागपूर पोलिसांनी भाजप नेते आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भाजप नेत्यावर पोलिसांना धमकावून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील या प्रकरणामुळे आता याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. घरातील भांडणानंतर भाजप नेते ओमप्रकाश उर्फ ​​मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव हे एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मुन्ना हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. दोन गटातील हाणामारी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली पोलिसांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुन्ना यांची मुले करण आणि अर्जुन यांच्यावर बाला यादव आणि त्याच्या मित्रांनी हल्ला केला. यानंतर करण आणि अर्जुनच्या समर्थकांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हाणामारीनंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यात पोहोचले, जिथे त्यांच्यात वाद सुरू होता. नेत्यावर पोलिसांना धमकावल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्या एका कारमधून धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच अर्जुन याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच मुन्ना हे देखील तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांशी गैरवर्तन केले आणि त्यांना धमकावले. नंतर, जेव्हा पोलिस बाला यादवच्या जखमी मुलांना रुग्णालयात घेऊन जात होते, तेव्हा मुन्ना यांनी पुन्हा पोलिसांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. धमकीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी मुन्ना आणि त्यांच्या मुलांवर भारतीय न्यायिक संहिता अंतर्गत हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरीने सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठी आज निघणार मोर्चा, शाळांना सुटी जाहीर:क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर 4 तास आंदोलन बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १२ धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येईल, अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article