लोकसभेच्या काळात काँग्रेसच्या काही नेत्यांची रात्री गडकरींसोबत चर्चा:काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ

2 hours ago 1
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करत होते. असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला आहे. नितीन गडकरी यांच्या फोन कॉल मुळे काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी घरी शांत बसून राहिले, असा आरोपही त्यांनी केला. काही नेते हे दिवसा काँग्रेसचा प्रचार करायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधत होते, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीला आता काही महिने लोटली असून आता लवकरच विधानसभा निवडणुकीची देखील घोषणा होत आहे. मात्र या घोषणे आधीच काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे. काही नेते दिवसभर माझ्यासोबत फिरत होते आणि रात्री गडकरी यांच्यासोबत फोनवर बोलत होते. या सर्व नेत्यांची यादी आमच्याकडे असल्याचा दावा देखील विकास ठाकरे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही, या सर्वांचे यादी माझ्याकडे असून त्या सर्वांना मी माफ केले असल्याचे देखील ते म्हणाले. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत माझी नजर त्या सर्वांवर राहील. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशी जो कोणी गद्दारी करेल, त्यांना पक्षाने बाहेरच रस्ता दाखवावा अशी मागणी देखील विकास ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेसच्या बंडखोरांना पक्षात स्थान नाही काँग्रेस पक्षात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, पक्ष कोणत्याही एकाच उमेदवाराला एका मतदारसंघातून उमेदवारी देईल. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जो कोणी बंडखोरी करेल, त्यांनी नीट विचार करून घ्यावा, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या या सर्व प्रकारातील आरोपामुळे आता याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्वात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अद्याप ठाकरे यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यावर नाना पटोले काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... मुख्यमंत्री 40% तर चिरंजीव 20%:संजय राऊत यांचा शिंदेंवर पलटवार; हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश मविआसाठी शुभशकुन असल्याचा दावा लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेचा चौथा हप्ता देखील मिळणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या सरकारचे ओव्हर ड्राफवर पैसे देणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचे पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कर्जावर राज्य सरकार चालू असल्याचे राऊत यांनी म्हणाले आहे. पूर्ण बातमी वाचा... 'परिणाम वाईट होतील':नागपूर पोलिसांना धमकावल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांचा जिल्हा असल्याने चर्चा नागपूर पोलिसांनी भाजप नेते आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भाजप नेत्यावर पोलिसांना धमकावून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील या प्रकरणामुळे आता याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article