पालकांनी काळाची पावले ओळखून जागरूक होणे गरजेचे:रानवड महाविद्यालयात पालक मेळाव्यात वाघ यांचे प्रतिपादन

2 hours ago 2
शाळा-महाविद्यालयात आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला म्हणजे आपली जबाबदारी कमी झाली असे समजू नये. काळाची पावले ओळखून अलिकडे पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. शिक्षक आणि पालक संवाद घडून आला तरच आपल्या पाल्याविषयी पालकांना कळू शकते, असे प्रतिपादन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे पब्लिक रिलेशन डायरेक्टर अजिंक्य वाघ यांनी केले. के. के. वाघ महाविद्यालय रानवड येथे आयोजित पालक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री शकुंतला वाघ होत्या. त्यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आदर्श पालकत्व म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे. पाल्याला घडवताना आपल्यातला पालक घडत जातो. त्याच्या भवितव्याचा विचार करून त्याच्या भविष्याचा वेध घ्यायचा असतो, असे त्या म्हणाल्या. प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे यांनी प्रास्ताविक केले. नॅक समन्वयक प्रा. मिलिंद पवार यांनी पीपीटी सादरीकरणातून महाविद्यालयाची माहिती दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article