भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.(Image source- X)
Published on
:
16 Oct 2024, 8:46 am
Updated on
:
16 Oct 2024, 8:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (दि.१६) बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे; पण पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे वाहून गेला आहे. यासामन्यात अद्याप नाणेफेकही झालेली नाही.
भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू स्टेडियमवर पोहोचले आहेत. काही खेळाडू मैदानात येऊन सराव करतानाही दिसले. चिन्नास्वामी यांची ड्रेनेज व्यवस्था उत्कृष्ट आहे. या प्रकरणात ते सहजपणे वाळवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
न्यूझीलंड विरु्दधची मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताला आणखी आठ कसोटी खेळायच्या आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकावे लागणार आहेत. न्यूझीलंडचा संघ माजी कर्णधार केन विल्यमसनशिवाय मैदान उतरले. केन दुखापतग्रस्त असल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे.