पीडितांचे निरपेक्ष समुपदेशन करुन मूल्यांकन करावे:न्यायमूर्ती मंगला कांबळे यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
वेगवेगळ्या घटनांमधील पिडित बालके व समस्याग्रस्त व्यक्तींचे अत्यंत निरपेक्षपणे समुदेशन करुन एकूणच घटनेचे मुल्यांकन केले गेले पाहिजे, असा महत्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंगला कांबळे यांनी मांडला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच विपला फाऊंडेशनच्यावतीने (मुंबई) एम. ए. समुपदेशन व मानसोपचार या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालकांचे समुपदेशन व त्याचा सकारात्मक परिणाम’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते. तर अतिथी म्हणून दुसरे वक्ते डॉ. अनिरुद्ध पाटील व सेव्ह द चिल्ड्रेनचे डॉ. विकास सावंत उपस्थित होते. न्या. कांबळे यांनी बालक व स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला कसा प्रतिबंध घालता येईल, यासाठी कोणते कायदे आहेत, त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल आणि संबंधित पोलीस विभाग तसेच न्याय विभाग आणि इतर सामाजिक संस्था यांची कशी मदत घेता येईल, याविषयी समुपदेशकांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात बालकांचे संरक्षण व त्यांचे समुपदेशन या विषयावर डॉ. विकास सावंत यांनी बालकांचे मूलभूत अधिकार, त्यांचे संरक्षण विषयक कायदे, त्यांचे हक्क काय आहेत ? तसेच बालकांचे समुपदेशन कसे करावे, त्यांचा विश्वास कसा संपादन करावा याविषयी समुपदेशकांनी कोणती जीवन कौशल्ये विकसित करावी, याचे प्रात्यक्षिक विविध चित्रफिती दाखवून समजावून सांगितले. प्रा. सुरेश रहाटे यांनी आपल्या संवादातून बालकांचे हक्क व संरक्षणासाठी समुपदेशकाची भूमिका किती महत्त्वाची असते हे विषद केले. तर डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी संरक्षण विषयक कायदे यावर प्रकाश टाकला. बालकांच्या समुपदेशनामध्ये कोणत्या अडथळे आणि अडचणी येऊ शकतात, त्यांचा विश्वास कसा संपादन करावा त्यांचे समुपदेशन कसे करावे, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तृतीय सत्रामध्ये डॉ. प्रतिभा टेटू यांनी आनंदी जीवन कसे जगावे ? जीवनात जीवन कौशल्याचे महत्त्व काय? ती विकसित कशी करावी? त्याचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. श्रीकांत पाटील यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी समाजाच्या विकासासाठी कसे उपयुक्त आहेत, हे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. संचालन प्रा. अर्चना ढोरे, तर आभार प्रा. सुरेश रहाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. जुबेर खान, प्रा. शिवानी अग्रवाल, प्रा.प्रियंका तायडे, प्रा. स्नेहल वानखडे यांनी सहकार्य केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article