फडणवीसांच्या मराठा द्वेषामुळे राजकारणात जाण्याची वेळ:मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा निशाणा; विधानसभा लढवण्याचे संकेत

3 days ago 3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. निवडणूक आज जाहीर होणार असल्या तरी देखील त्या दोन-चार दिवस पुढे ढकलून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी पुन्हा निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळे आमच्यावर राजकारणात जाण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्यासह मराठा समाजाला राजकारणात जायचे नाही. मात्र तुम्ही आमची वाट लावाल तर मराठे देखील तुमची वाट लावतील, असा इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो केवळ आमच्या मागण्या मान्य करा, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपला मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारच्या वतीने 16 ते 17 जाती या ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या समाजाची ही मागणी नव्हती. कोणाचीही मागणी नसताना देखील राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला छेडण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा... महाराष्ट्र - झारखंड निवडणुकीची आज घोषणा:EC ची दुपारी 3.30 वा. PC; महाराष्ट्रात एका, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदानाचा कल कायम ठेवला जाऊ शकतो. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. पूर्ण बातमी वाचा... काल रात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप:प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा कोटी रुपये पोहोचले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. मात्र या घोषणेच्या आधीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. महायुती सरकार आमदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या वतीने काल रात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप केले गेले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही, सगळ्यांना पैसे पोहोचले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article