फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्यास युतीच्या जागा कमी होतील:त्यामुळेच भाजप धाडस दाखवत नसल्याची रोहित पवार यांची टीका

4 hours ago 1
महाराष्ट्रामध्ये 110 ते 120 महायुतीचे उमेदवार निवडून येतील, अशी शक्यता आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणले तर त्यांच्या आणखी 20 ते 30 जागा कमी होतील. अशी भीती असल्यानेच फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याचे भाजपाचे धाडस होत नसल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या माध्यमातून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती असो किंवा महाआघाडी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महायुती विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला सामोर जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी दिले होते. यावर आता रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. विजयाच्या समीकरणावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा अवलंबून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत तीनही पक्षात एकमत झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजयाच्या समीकरणावरच महाआघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अवलंबून असेल. दुसरीकडे महायुतीमध्ये देखील अशीच परिस्थिती दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जात असल्या तरी भविष्यात भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतो. तसे संकेतही भाजपतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर महाआघाडी आणि महायुती यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... भाजप उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही, क्षमतेवरच उमेदवार ठरतो:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे. त्यामुळेच हे डबल इंजन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचे काम करत असल्याचे ते म्हटले. पूर्ण बातमी वाचा... निवडणुकीनंतर आघाडीतील नेते एकत्र राहतील याची खात्री नाही:शिंदे गटाच्या नेत्याचे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नेते एकत्र राहतील असे मला वाटत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडला आहे या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे केवळ निवडणुकीच्या स्वार्थासाठी हे नेते एकत्र आले असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा... छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई:या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला मिर्झापूरमधून अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथून यादव याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article