महायुतीमध्ये तारीख पे तारीख सुरू:जागा वाटपावर रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट

4 days ago 3
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारमध्ये जागा वाटपावरून बरेच खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. यातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमधील जागा वाटपावर भाष्य केले आहे. लोणावळा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, महायुतीत जागावाटपाचा तिढा हा तारीख पे तारीखमध्ये अडकलाय. अजून ही भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात वाद-विवाद सुरु असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच या तीन प्रमुख पक्षातील नेत्यांचा जागावाटपामधील तिढा लवकर सुटेल आणि आम्हाला योग्य त्या जागा मिळतील, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, कमी जागा मिळाल्या तरी मी दुसरा काही निर्णय घेणार नाही. आम्ही महायुती बरोबरच राहणार आहोत. राज ठाकरे विरोधात आहेत, प्रकाश आंबेडकर विरोधात आहेत. शिवाय संभाजीराजे आणि बच्चू कडूही विरोधात आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याची आमची भूमिका नाही. आम्हाला एमएलसी किंवा महामंडळं द्यावे. जिल्हा तालुक्यातील कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळावा. या गोष्टींचं महायुतीने आम्हाला आश्वासन द्यावे, असे रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक नेते जात आहेत, यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, आमच्याकडे तिकीट मिळत नसल्याने ते शरद पवारांकडे जात आहेत. त्यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे असे म्हणता येणार नाही. हर्षवर्धन पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना विधानपरिषद दिली असती तर ते गेले नसते, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article