महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज:संतापून पंचांना लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येते? रोहित पवारांचा सवाल

2 hours ago 1
संतापून पंचांना लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येते, असा सवाल करत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. मल्लांना 3 वर्षे निलंबित करणे हे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर निकाल मान्य नसल्याने डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या पैलवान शिवराज राक्षे याने प्रचंड गोंधळ घातला आणि त्यानंतर त्याने थेट पंचांना लाथ मारली. यानंतर सध्या या कुस्तीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितले पाहिजे. 3 वर्षांसाठी निलंबित करणे अन्यायकारक रोहित पवार यांनी म्हटलंय की, मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावाच शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज आहे.​​​​​​​ राक्षेने पंचाची गचांडी धरून लाथ मारली उपांत्य फेरीच्या गादीवरील लढती दोन वेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. या सामन्यात पंचांनी राक्षेला चितपट व मोहोळला विजयी घोषित केले. या निकालावर संताप व्यक्त करत राक्षेने पंच संतोष भुजबळ यांची गचांडी धरत लाथ मारली. त्यामुळे एकच गदारोळ झाला. अंतिम सामन्यात गायकवाडने पराभव अमान्य केल्याने खुर्च्यांची फेकाफेक झाली होती. निर्णय चुकला, पण खेळाडू वृत्ती ठेवा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शिवराज पराभूत झाल्यानंतर त्याने पंचांना शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला, तसेच मारहाणदेखील केली. रिप्लेमध्ये पंचांचा निर्णय चुकल्याचे दिसून येते. मात्र खेळामध्ये कधी कधी पंचांचा निर्णय चुकतो. खेळात पंचांना देवाचे स्थान आहे. इतर खेळाप्रमाणे खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने निर्णय मान्य करायला हवा होता, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.​​​​​​​ अध्यक्षांकडून तातडीने कारवाई महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धेत नियमभंग करणारा शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हे दोन्ही मल्ल यापुढे तीन वर्षे कुठलीही स्पर्धा खेळू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article