राज्यात हिंदूचे रक्षण करणारे सरकार:महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा, आता धर्मांतर खपवून घेणार नाही; नीतेश राणेंचा इशारा
2 hours ago
1
राज्यात आता हिंदूंचे रक्षण करणारे सरकार आले आहे. आता धर्मांतर खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा लागू करणार आहोत, असे भापज आमदार नीतेश राणे म्हणाले. हिरवा रंग धारण करणाऱ्या सापांनी वळवळ सुरू आहे. लव जिहाद प्रकरणातून हिंदू मुलींची केली जातेय. त्यांची वळवळ कमी झाली नाही, तर प्रत्येकाला आतमध्ये टाकू, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला. चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना नीतेश राणे यांनी मुस्लीम समाजाला लक्ष्य केले. आम्ही सर्व हिंदू विचाराचे लोक आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडवट हिंदू मुख्यमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व करीत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारमध्ये आहेत. गो हत्या बंद करा, अन्यथा प्रत्येक वॉर्डात वराह जयंती करावी लागेल. यासाठी आम्हाला कोणाची परवानगी काढावी लागणार नसून सरकारच आमचे आहे. हे सरकार हिंदूचे आहे. सरकारमध्ये असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्या हातात आहे. कोण कुणाची अवेळी बिर्याणी खात आहे. कोण कुणाची दाडी कुरवाळत आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही त्याचा वेळीच कार्यक्रम करू असा इशारा नीतेश राणे यांनी दिला. सरकारमध्ये हिंदू समाजाचे बाप
नीतेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर जागा दाखवू. तेव्हा तुमचा पाकिस्तान मध्ये बसलेला अब्बा काही करू शकणार नाही. हिंदू समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करीत आहेत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या स्थान नाही, हिंदू समाजाचे बाप सरकारमध्ये आहे. उगाच वळवळ राज्यात करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी आहे. धर्मांतर खापवून घेणार नाही. राज्यात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा लवकरच आणू. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. आता चालणार नाही. ... तर शाहरुख, सलमानचा कार्यक्रम करू
राज्यात सरकार आणण्यासाठी हिंदू पाठीशी राहिला. त्यामुळे हिंदू समाजासाठी काम करणार आहे. रोहण्यांना राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे. तेव्हा तुम्ही बॅग भरा आणि पाकिस्तानात चालते व्हा असेही राणे म्हणाले. शाहरुख खान व सलमान खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर माझ्याकडे या. त्यांची नावे द्या त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करू असेही राणे म्हणाले. तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकातो आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो आहे हे लक्षात ठेवा. मी मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे असेही राणे म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)