महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे:सत्ता चुकीच्या हातात गेली, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

4 days ago 2
फलटणमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी दीपक चव्हाण यानं फलटण मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली होती. असे असताना देखील दीपक चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, आपल्याला महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, असे म्हणत शरद पवारांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहिण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे होते. पण बारामतीकरांना मताच्या स्वरूपात बहिणीला पाठिंबा दिला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला 60 वर्षात एकदाही सुट्टी दिली नाही. मला 4 वेळा मुख्यमंत्री केले. महाराष्ट्राचा चेहरा बादलायचा माझी नैतिक जबाबदारी आहे. चुकीच्या हातात सत्ता आहे. महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. शाळेत मुलींवर अत्याचार होत आहेत. काल एका माजी मंत्र्याची हात्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणी सुरक्षित नाहीत, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आपल्याला लांब जायचे आहे. या तुतारीने संबंध देशात आवाज आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले? फलटणमध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमत नव्हतं. पण तुम्ही ते जमवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. फलटणमध्ये नव्हे तर संपूर्ण गावागावात गेल्यानंतर सांगितले जाते तुतारी हाती घ्या. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. हरियाणासारखे महाराष्ट्रात घडू शकत नाही. कारण टायगर अभी यहाँ खडा हैं. मागील वर्षी 2 जुलैला घेतलेला निर्णय हा मारून मुटकुन घेतलेला होता. मात्र आता मनापासून निर्णय घेतला आहे. दिल्लीपतीसमोर गुडघे टेकणे बास, आता निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही आणि स्वाभिमान विकणार नाही आमदार दीपक चव्हाण काय म्हणाले? आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून मी पक्षात काम करत आहे. 2009 साली मला विधानसभेची संधी मिळाली. 2009 पासून आजपर्यंत 3 टर्म फलटण तालुक्याचे मी प्रतिनिधित्व करतोय. सुरुवातीपासून शरद पवारांसोबत काम करतोय. ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा आमच्या सर्वांसमोर धर्मसंकट उभे राहिले. शरद पवारांबाबत जेवढा आदर तेवढाच अजितदादांचा आहे. घरातच फूट पडल्यामुळे नेमका निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. महाविकास आघाडीत आम्ही अडीच वर्ष सत्तेत होतो. जेव्हा सरकार पडले तेव्हा आमची जी कामे होती, त्याला तात्काळ स्थगिती दिली. वर्षभर कामे खोळंबली, लोकांच्या मागण्या, तालुक्याचा विकास पुढे करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात आम्ही महायुतीत सहभागी झालो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article