महाराष्ट्रात खोके आणि धोक्याचे सरकार, जनता लवकरच यांचा हिशोब करेल; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

2 hours ago 1

रत्नागिरी स्टेशनच्या सुशोभिकरणानंतर त्याच्या उद्घाटनाआधीच त्याचे छत कोसळल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मिंधे भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील या घटनेवरून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात खोके आणि धोक्याचे सरकार, जनता लवकरच यांचा हिशोब करेलच, असा हल्लाबोल प्रियंका यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरुन केला आहे.

महाराष्ट्र में रत्नागिरी स्टेशन की छत उद्घाटन से पहले ही ढह गई। उधर, मुंबई-नासिक हाईवे जो अभी पूरी तरह तैयार भी नहीं हुआ, उसमें 500 से ज्यादा गड्ढे और दरारें पड़ गईं।

इससे पहले सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति उद्घाटन के कुछ ही महीने में ढह गई थी। मुंबई में 18… pic.twitter.com/wIIoV3tE8b

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 7, 2024

प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर लिहीले आहे की, महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. दुसरीकडे, मुंबई-नाशिक महामार्ग, जो अद्याप पूर्णपणे तयारही झाला नव्हता, त्यावर 500 हून अधिक खड्डे आणि भेगा पडल्या आहेत. याआधी सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे गेले आहेत. महाराष्ट्रात ‘खोके आणि धोके’ सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील जनता याचा लवकरच हिशोब करणार असल्याचा हल्लाबोल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article