मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले:वकील गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून येणार बाहेर?

4 days ago 2
वकील गुणरत्न सदावर्ते हे सध्या बिग बॉस हिंदीच्या घरात गेले आहेत. मात्र त्यांना आता लवकरच घरातून बाहेर पडावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले असल्यामुळे गुणरत्न सदावर्ते लवकरच बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली, यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्तणूकीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाची एवढी महत्त्वाची सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलए आहेत, अशी माहिती वकिलांकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. यावर या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचे गांभीर्य नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले?, असा सवाल हायकोर्टाने केला आहे. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदावर्ते यांना युक्तिवाद करता येणार नाही. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्याने गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीच्या घरातून बाहेर पडत आहेत. मात्र त्यांच्या केसेसच्या सुनावणीनंतर ते पुन्हा बिग बॉसच्या घरात जाणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित प्रकरणाची सुनावणी आता 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा बिग बॉसच्या घारात जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article