मुंबईतील गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून:शिंदे-फडणवीस राजकारणासाठी गुंडांचा वापर करताहेत- संजय राऊत

4 days ago 3
गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रकरण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यासारखे आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचे सगळे सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. अजितदादांनी सीएमचा राजीनामा मागावा संजय राऊत म्हणाले की, अजितदादांच्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली आहे. पण त्यांनी तर फक्त निषेध व्यक्त केलाय. खरंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे.राज्यात अडीच सिंघम असताना सिद्दीकींची हत्या होते. राज्याची कायदा सुव्यवस्था कोलमडून पडली, त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसताय, असे म्हणत राऊतांनी अजित पवार यांना सुनावले आहे. गुंडांचा राजकारणासाठी वापर सुरू संजय राऊत म्हणाले की, सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे कधी कुठून गोळी चालेल कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई आणि पुण्यात याचा भरोसा नाही. या सगळ्या गुंडाचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, मुख्यमंत्री शिंदे एकेकाळी म्हणाले होते ना, की मुंबईत लॉरेन्स बिश्नोई वगैरे गँग चालणार नाही,मी बघून घेईन, मग आता बघून घ्या ना असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 50 हजार कोटींचे ड्रग्ज सूटले संजय राऊत म्हणाले की, गुजरातमध्ये आजही 5 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले आहे. याचाच अर्थ 50 हजार कोटींचे ड्रग्ज सूटले असून संपूर्ण देशात पसरले आहे. हा पैसा कुणाकडे, कोणत्या पक्षाकडे जातो? या पैशातून कोण निवडणूक लढते हे सांगण्याची गरज नाही. पब्लिसीटीसाठी शिंदेला गोळ्या घातल्या संजय राऊत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला गोळ्या घालण्यात आल्या, कारण शिंदे सरकारला पब्लिसीटी हवी होती. आता बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांना गोळ्या घाला. मुख्यमंत्री मोठ्या तोऱ्यात म्हणाले होते की ‘बिष्णोई गँगचे मुंबईमध्ये काही चालणार नाही, मी बघून घेईल’, आता बघून घ्या, असेही राऊत यावेळी म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article