राज्यात 9 कोटी 59 लाख मतदार:4 कोटी 95 लाख पुरुष, 4 कोटी 64 लाख महिला, 19.48 लाख फर्स्ट टाईम व्होटर्स; 20 नोव्हेंबरला मतदान

3 days ago 2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रांवर 9 कोटी 59 लाख मतदार आपला मताधिकार बजावतील. यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार आहेत. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल. त्यानुसार तत्पूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येईल. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यावेळी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत गर्दीच्या मतदान केंद्रांवर खुर्च्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचा आग्रह धरला होता. राज्यात 19.48 लाख फर्स्ट टाईम मतदार राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात 4.59 कोटी पुरुष, तर 4.64 कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून दिव्यांग मतदारही 6.32 लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे 18 ते 19 वर्ष वयोगटातील संख्या 19.48 लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी राज्यात 1.86 लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 52585 केंद्र शहरी भागात, तर 57,601 केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदार असतील. विशेषतः 350 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडे असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक काळात एटीएम व्हॅनवर निर्बंध निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रुग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. गैरप्रकाराच्या तक्रारी अ‍ॅपवर करता येणार निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक खास अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या अ‍ॅपवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार घोषणा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांत तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? ते सांगावे लागणार आहे. राजकीय पक्षांनाही हा नियम लागू असेल. त्यांनाही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली? हे नमूद करावे लागेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article