लढू, जिंकू आणि सरकार बनवू:निवडणुकीची घोषणा होताच संजय राऊतांनी फुंकले रणशिंग

3 days ago 3
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या घोषणेनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लढू, जिंकू आणि सरकार बनवू, असे संजय राऊत म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकसभेपेक्षा विधानसभेला महाविकास आघाडीचा स्ट्राइक रेट चांगला असेल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मोदी, शहा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समर्थनाने जे घटनाबाह्य सरकार बसवण्यात आले आहे त्याला जनताच पायउतार करेल, असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी असून आम्ही लोकसभेला एकजुटीने लढलो, तसेच विधानसभेलाही लढू. जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हा आकड्यांचा खेळ नसून जिंकण्याचा खेळ आहे. जो जिंकेल त्याची जागा असे सूत्र असून आम्ही लढू, जिंकू आणि सरकार बनवू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा देखील मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला, यातून लाडक्या बहीणींची मते वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र आता याचा निकाल काय लागणार हे लवकरच कळणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article