लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून संभाजीराजे संतापले:तुम्ही राजकीय स्टंट करू नका, महायुती सरकारला दिला इशारा

4 days ago 3
नांदेड येथे रविवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शांताबाई शिवाजी मोर असे या मयत महिलेचे नाव आहे. या घटनेवर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, नांदेड येथे रविवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 10 वाजल्यापासून महिलांना सक्तीने बोलावण्यात आले होते. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र प्रशासनाने हा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचे सांगितले. तुम्ही पैसे द्या, त्यांच्या अकाऊंटवर टाका तुमचे कौतुक आहे. पण राजकीय स्टंट करू नका, अशी टीक छत्रपती संभाजीराजे यांनी महायुती सरकारवर केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभा निवडणुकीवर मोठे वक्तव्यं केले आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आमचा माणस आहे आणि अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, आम्ही विस्थापित लोकांना संधी देणार आहोत. पण चांगले लोक प्रस्थापितांमधून आले तर त्यांचे पण आम्ही स्वागत करू. महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारवर टीका करताना संभाजीराजे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये गोंधळ सुरू आहे. त्यांनाच माहीत नाही की त्यांचे नाराज लोक कुठे जाणार आजेत. थोड्या दिवसांत वेगळे चित्र दिसेल. मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केली आहे की पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोण ठेवला पाहिजे. आपली लोक तुमच्या माध्यमातून असेल किंवा स्वराज्याच्या माध्यमातून असतील हे लोक विधानसभेच्या पटलावर आपला आवाज मांडू शकतील, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाज शाश्वत नाही. समाजाचा आग्रह होता मराठा कुणबी एकच आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाले नाही. मी सुद्धा ही लढाई 2007 पासून लढत आहे. त्यामुळे 10 टक्के आरक्षण टिकेल की नाही माहीत नाही, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, येवला येथे मराठा आंदोलक आणि भुजबळ समर्थकांमध्ये वाद झाल्याचे समजले. आपण समाज म्हणून एकत्रित राहतो. मराठा असो की ओबीसी असो किंवा अन्य कोणता समाज, आपल्याला एकत्रित राहायचे आहे. मोठ्या नेत्यांनी सुद्धा दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे विधान करू नये, असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article