विधानसभा निवडणुकीतही संविधानाचा मुद्दा असणार:राज्यात महाविकास आघाडी जिंकल्या केंद्रात झटके बसतील - विजय वडेट्टीवार

3 days ago 3
विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही आमच्याकडून संविधान हा मुद्दा असणार आहे, असे वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितले. राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील. देशाचे संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? विधानसभा निवडणुकीची घोषण होण्याच्या एक दिवस आधी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांना शपथविधी दिला जातो, ही कुठली नितीमत्ता-नैतिकता आहे. हे सर्व कायदा गुंडाळून काम सुरू आहे. महायुतीने महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्यास ते पुन्हा संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न करणार, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी संविधाला हात घाल नये, यासाठी आम्ही त्यांना लोकसभेला थांबवले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकल्यास पंतप्रधान मोदींच्या दोन कुबड्या गळून पडतील. त्यानंतर त्यांना संविधान बदलण्याचा आणि लोकशाहीला हात घालण्याच हिंमत राहणार नाही. महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर कदाचित उद्या नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत संविधानाचे रक्षण होणे गरजेचे आहे. देशाच्या रक्षणासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमचा संविधान हा मुद्दा असणारच, असे ठामपणे सांगितले. देशाचे संविधान वाचवण्यासाठी राज्यातील निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article