विनयभंगातील आरोपीचा पक्ष न पाहता अटक करा:राज ठाकरे यांचा संताप; ठाण्याच्या पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट

2 hours ago 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ठाण्यातील विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न पाहता त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यातील भंडार आळीत एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या सचिन यादव नामक एका उपविभागप्रमुखाचे नाव पुढे आले होते. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह नागरिकांनी गुरुवारी मोर्चा काढला होता. हा मोर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावालगतच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी आरोपीवर अतिरिक्त कलमे लावून त्याला मंगळवारपर्यंत अटक करण्यात आली नाही तर ठाणे बंदची हाद दिली जाईल असा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या ठाणे दौऱ्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोपीचा पक्ष कोणता हे न पाहता त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, माझे पोलिसांशी बोलणे झाले आहे. बदलापूरसारखे तुम्ही हे प्रकरण अंगावर घेऊ नका. आरोपी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्त्वाचे नाही. कारण, कोणत्याही पक्षाची कधी अशी भूमिका नसते. पण एखाद्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्याच्या विकृतीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, तर आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला अटक झाली पाहिजे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालय आरोपीला जामीन देतेच कसा? या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीला तत्काळ अटक करा असे मी पोलिसांना सांगितले आहे. मनसे आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या राज ठाकरे म्हणाले, सरकारने टोलमुक्तीचे आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. हे आंदोलन आम्ही घरच्या सत्यनारायणासाठी केले नव्हते. ते आंदोलन आम्ही जनतेसाठी केले होते. टोलमुक्ती मिळाल्यानंतर आज सर्वजण आनंदी असतील. पण एवढी वर्षे टोलधाड आपल्यावर पडली, टोलचे किती पैसे जमा झाले, ते कुणाकडे गेले याची कोणताही कल्पना नव्हती. आमचा पक्ष एवढ्या वर्षांपासून याविरोधात आंदोलन करत आहे. त्याला आता यश आले आहे. त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे काम अभिनंदनीय आहे, असेही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. हे ही वाचा... भाजप हरियाणासारखी महाराष्ट्रात बाजी मारणार?:शिंदेंच्या मराठा चेहऱ्यासह बसप, MIM चे एकेक मत महायुतीला लाभ पोहोचवणार मुंबई - हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप बॅकफूटवर राहून पराक्रम गाजवण्याचा विचार करत आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत हरियाणात फारसे यश मिळाले नाही. पण त्यानंतर विधानसभा निवडणूक येईपर्यंत भाजपने येथील हरलेली लढाई जिंकून दाखवली. महाराष्ट्रातही असेच काही घडू शकते. महाराष्ट्रातही भाजपप्रणीत महायुतीला लोकसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. आता हरियाणासारखा डाव टाकून भाजप महाराष्ट्रातही बाजी मारण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेवर काम करत असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article